हो वाटते काही लोकांना.
एक मित्र आहे माझा. मला बंगलोर ला भेटला.आम्ही एकाच प्रोजेक्ट वर होतो. पहिल्या भेटीत नाव गाव सांगितला. म्हणाला मुंबईचा आहे. मी म्हणालो वाह मराठी साथीदार भेटला. नंतर म्हणतो कसा दुसरंच वाक्य I Usually speak in English. I prefer it. माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. आणि असं पण नाही कि लई भारी फाड फाड कोकाटे इंग्लिश बोलतोय. मराठीच इंग्लिश मध्ये रुपांतर करून बोलत होता. कळत होता बोलला की. मराठी शाळेत होता शिकायला तो हे नंतर समजलं.
मी सरळ बोललो त्याला हो का? बर बर … नंतर मी रेटानी मराठीत बोलत बसलो. झक मारून त्याला मराठीत बोलायला लागला.असुरी आनंद झाला होता मला. गगनात मावत नव्हता तो आनंद इतका. नंतर आम्ही १००% मराठीतूनच बोलायचो,आणि बोलतो. नंतर असाच एकदा त्याला विचारला कि का रे त्यावेळी म्हणालास कि I prefer english etc etc. तर म्हणाला कि professional वाटत इंग्लिश मध्ये. म्हणालो ऑफिस मध्ये बोल घरी काय? आणि परत असला फालतूपणा कोणाला सांगू नकोस.
आमचा अजून १ रूम मेट होता. एक नंबर चा third class. त्याच्याशी पण पहिली भेट बर का….
त्यांनी पण नाव गाव सांगितला. म्हणाला मध्य प्रेदेश चा आहे. म्हणून आमचा जय राष्ट्रभाषा चालू झाल. नंतर म्हणाला कि जन्मापासून म्हणजे २५ वर्ष मुंबईतच आहे. मग म्हणालो मग तू MP चा कसा? मी म्हणालो तुला मराठी येतंच असेल? तो म्हणाला कि मराठी माझी चौथी भाषा आहे. मी म्हणालो. चौथी? तो बोलला हो.१लि हिंदी, नंतर कोणती तरी मध्य प्रदेशाची,नंतर इंग्लिश आणि मग मराठी. काही वेळा पूर्वी तळ पायाची आग मस्तकात होती ती आता मस्तक फोडून बाहेर गेली.
अजून पुढचं वाक्य ऐकून मी त्याच्या कानशिलात द्यायचा बाकी होतो. मी मराठी चालू केली तर हा पण म्हणे कि मी मराठीत बोलत नाही, कारण मराठी माझी मातृभाषा नाहीये, मी मुंबई मध्ये पण कधी मराठीत बोलत नाही. आणि anyway मुंबई महाराष्ट्रात नाहीये, मग प्रश्नच येत नाही. म्हणालो दारू प्यायला आहेस कि काय? काही पण काय बोलतोस? मग कुठलं टुकार तत्वज्ञान सांगत होता देव जाणे. मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आणि तो पटवून द्यायच्या लायकीचा पण नव्हता.
नंतर एकदा कोणाशी तरी फोन वर अस्खलित मराठी बोलत होता. मला बघून ओशाळला. मी विचारला की तुला मराठी येत तर.बोलत का नाहीस? त्यानी हिंदीतून उत्तर दिलं की अच्छा नाही लगता| मला त्या गेस्ट हौस मध्ये म न से चे आंदोलन करावास वाटल. दिसला की दे रट्टा.
तिथे बंगलोर मध्ये आमचा प्रोजेक्ट मेनेजर पण मराठीच होता. आमचा दैनंदिन काम, emails पण मराठीत चालायच्या पण हा हिंदी सोडायला तयार नव्हता. त्या मेनेजरनी पण मराठीत बोलून पहिल पण नाही…
इथे अमेरिकेत काही मराठी कुटुंबे भेटली. त्यांच्या मुलांना मराठी नीटसा पण नाही तर येतंच नव्हता. म्हंजे त्यांच्या कडे पुढच्या पिढीत मराठी पूर्ण नामशेष होणार. अमेरिकेत असू तर लहानग्यांना शाळा कळण्याच्या दृस्तिनी इंग्लिश शिकवला / बोलला तर ठीके पण मराठीतून सोडून फक्त इंग्लिश? एका तमिळ मित्राकडे गेलो तर त्याचा ३ वर्षाचा मुलगा घरी तमिळ मधेच बोलत होता. मला खूप खटकला हे.
त्या मराठी कुटुंबातील आई मुलाला म्हणत होती की come रे. say hello to काका, आणि अजून खूप काय काय ….. माझ्या अंगावर काटा आला होता असं मराठमोळ इंग्लिश ऐकून. म्हणणार होतो असे दोन दोन भाषांचे खून करू नका… त्या लहान मुलांशी धड इंग्लिशमधून पण बोलता येत नव्हता आणि मराठीतून पण. मी हातवारे करून काम चालवून घेतला. कारण त्याला छोट्या मुलाला गो वेअर चड्डी असं ऐकायची सवय……………..
त्या मुलाला त्याची आई इथे इथे बस रे काऊ, दाणा खा पाणी पी हे गाणे कसे बरं म्हणेल? कारण या गाण्याचं इंग्लिश मध्ये किळसवाणे भाषांतर होईल, दुसरा म्हणजे अमेरिकेत कावळा म्हणजे काय हेच त्याला नाही समजणार 🙂
नंतर अमेरिकेत पण काही महाभाग भेटले. काही तमिळ काही मल्लू त्यांचा पण म्हणणं अजून आहे कि मुंबई महाराष्ट्रात नाही.
बोलणारे इतके आत्मविश्वासानी बोलतात कि भारताबाहेरच्या माणसाला खर वाटावं. पण असं का विचारल्यावर समर्पक उत्तर नाही त्यांच्या कडे .पण मुंबईबद्दल असं मत का व्हावं हे मला कळत नाहीये.
मला कळलं नाही तरी काही फरक पडत नाही, उडत गेले ते. पण लोकांचा हेतू तरी कळेल ना की ते असा का म्हणत आहेत.
mi pan tujhya jaagi asate tar don kanshilat chadhwalya astya tujhya roommmate chya.
shappath!
मित्रा …
छान वाटला तुझा ब्लॉग, मला सुद्धा राग येतो जेव्हा लोक मुंबई आणि महाराष्ट्राला वेगळं म्हणतात …किंवा करण्याचा प्रयत्न करतात …
मीही शक्यतो मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करतो … जरी साऊथचा करूणानिधी असला तरी …!
अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा !!!!
विजय
ब्लॉग वाचल्या बद्दल आभारी आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
जय महाराष्ट्र.
ह्या सर्व गोष्टींना आपण मराठी मंडळीच जबाबदार आहोत. कानशिलात लगावणे हे तात्पुरते उपाय झाले. या उपायांनी हे प्रश्न मुळापासून सुटणार नाहीत. स्वभाषेचा आणि स्वसंस्कृतीचा अभिमान बाळगणे आणि तो उघडपणे, न लाजता सर्वांसमोर व्यक्त करणे हे महत्वाचे आहे. या बाबतीत बंगाली, तमिळ किंबहुना इतर सर्वच भाषक मराठी माणसांपेक्षा वेगळे आहेत. आपल्यासारखा स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड त्यांना नाही. आपल्याला वाटतं की आपण मराठीमध्ये बोलल्यास आपल्याला अडाणी, अशिक्षित समजतील. त्यामुळे आपल्याहून कितीतरी कमी शिकलेल्या हॉटेलातील बेअरर, दुकानदार, सुतार, कामगार इत्यादी (मराठी किंवा अमराठी) यांच्याकडे आपण हिंदीत बोलतो. अशिक्षितांकडे हिंदीत बोलून आपण कसले सुशिक्षितपणाचे प्रमाणपत्र मिळवतो? आपणच आपली भाषा बोलण्यास लाजलो तर इतर का बोलतील? हे चित्र बंगाल, तमिळनाडू वगैरे राज्यांत किंवा फ्रान्स, जर्मनी, जपान, इस्रायल इत्यादी देशात दिसणार नाही.
आपली भाषा बोलताना देखिल आपण गरज नसताना देखिल विनाकारण इंग्रजी, हिंदी शब्द घालतो. याबाबतीत टिळकांनी लिहिलेला खालील लेख मी वाचला. मला फार आवडला. तुम्हीही तो खालील दुव्यावरून वाचून पहावा.
शिवाय हिंदी ही राष्ट्रभाषा आहे या चुकीच्या गैरसमजाने देखिल मराठी माणसाचे खूप नुकसान केलेले आहे. त्यामुळे टपाल खाते, रेल-वे, सार्वजनिक उद्योग, केंद्र सरकारी कार्यालये, सरकारी बॅंका इथे मराठीला पूर्णपणे दुर्लक्षित करून हिंदी व इंग्रजीचाच वापर पाट्या, फॉर्मसाठी केला जातो, ह्याबद्दल आपल्याला काहीच खंत वा खेद वाटत नाही. हे इतर कुठल्याही राज्यात चालू शकत नाही, फक्त स्वतःच्याभाषेबद्दल व त्या अनुषंगाने स्वतःबद्दल न्यूनगंड वाटणार्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या महाराष्ट्र राज्यातच घडू शकते. कायद्याप्रमाणे हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाहीच आहे. यासंबंधीचा एक लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे, वाचून पहावा.
या विषयावर बोलण्यासारखे खूप आहे. वेळोवेळी चर्चा करूच.
आभार.
समीर
तुझ्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. आत्ता वेळेअभावी जास्त लिहू शकत नाही.
पण हा प्रश्न मार्गी लावलाच पाहिजे.
प्रिय मीपुणेकर,
उत्तराबद्दल आभार. (मीसुद्धा पुणेकर)
बरेच प्रश्न, काही उत्तरे. प्रत्येक मराठीप्रेमीने वाचावा असा एक लेख. दुवा खाली दिला आहे.