काय संबंध मुख्यमंत्र्यांचा या पुजेशी? मुख्यमंत्री झाले म्हणून काय लयी भारी झाले कि काय? वारकरी ३० ३० तास रांगेत थांबतात दर्शनासाठी आणि हे आपले सहकुटुंब गळ्यात हार तुरे घालून पूजा करताना फोटोसेशन करणार. काल ई-सकाळवर पण या बद्दल १ वृत्त वाचले.बर्याच लोकांनी याबद्दल आवाज उठवला आहे. हा आवाज आषाढ संपताक्षणी आसमंतात विरून गेला नाही म्हणजे मिळवलं.
खरेतर यासंदर्भात याआधीच उपाय योजना करायला हवी होती. ई-सकाळच्या लोकांनी याला वाचा फोडून खूपच स्तुत्य काम केलेले आहे.